सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती. घोषणा होती २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची. आता २०२२ हे वर्ष सरलंय. नवीन वर्ष आलं. पण सरकारनं दिलेल्या घोषणेचं काय झालं? हा प्रश्न आहेच. त्याचं उत्तर शोधण्यासाठी सरकारची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते.