कशी चालेल फाइव जीची जादू?

१४ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.

सन २०२१ च्या उत्तरार्धात भारतात ५-जी सुरू करू, असं चे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकत्याच झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमधे जाहीर केलं. त्या अनुषंगाने ५-जी म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला फायदा काय, हे जाणून घेणं रंजक आणि माहितीपूर्ण ठरेल.

२-जी, ३-जी, ४-जी म्हणजे नेमकं काय?

सगळ्यात आधी हे २-जी, ३-जी, ४-जी आणि आता ५-जी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. खरं तर या अत्यंत तांत्रिक बाबी आहेत. पण आपण मोबाईल फोनचा इतका वापर करतो की, त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं गरजेचं ठरतं.  

या सगळ्याची सुरुवात साधारणपणे १९७० च्या दशकात झाली. म्हणजे सगळ्यात आधी १-जी तंत्रज्ञानाचा शोध लागला. यातील ‘जी’ चा फुल फॉर्म आहे ‘Generation.’ म्हणजेच सत्तरच्या दशकात फोन सिग्नालसाठी लागणाऱ्या पहिल्या जनरेशनच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्यानंतर प्रत्येक दशकात हा आकडा २-जी, ३-जी, ४-जी आणि आता ५-जी असा वाढत गेला. आपला म्हणजे भारतीयांचा या ‘जी’शी संबंध आला ते ‘२-जी’ घोटाळ्यामुळे.

१-जीमधे अॅानालॉग सिग्नलचा वापर केला जात असे. नंतर २-जी आलं तेव्हा हेच सिग्नल डिजिटल रूपात वापरले जाऊ लागले. आता चाळिशीत असलेल्या लोकांना अगदी सहज समजू शकेल असा बदल म्हणजे, पूर्वी आपण आपल्या लँडलाईनवरून फोन लावायचो तेव्हा फोन लागेपर्यंत आपल्या इअर पिसमधून कडकट्ट कडकट्ट असा आवाज यायचा. पण तेच फोन जेव्हा डिजिटल सिग्नाल वापरू लागले तेव्हा कधी तरी टूँ टूँ असा आवाज येत असे किंवा फोन थेट लागायलाच सुरुवात झाली.  हाच १-जी आणि २-जीमधे फरक आहे. कडकट्ट आवाजाला फोन १-जी तंत्रज्ञानावर चालायचा, तर टूँ टूँ आवाजाचा फोन हा २-जी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. 

हेही वाचा : गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

मग ५ जी कशासाठी?

थोडक्यात काय, तर फोन सिग्नलची ताकद आणि गती यांच्यात या प्रत्येक बदलणाऱ्या ‘जी’प्रमाणे वाढ होत गेली. नव्वदच्या दशकाच्या शेवट ३-जी चालू झालं आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी ४-जी चालू झालं. यादरम्यान मोबाईल सिग्नल कसे ताकदवान होत गेले आणि इंटरनेटचा वेग कसा वाढत गेला, याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच.

आता तर भारतात ४-जी नेटवर्क जवळपास सगळीकडे उपलब्ध आहे. चांगली रेंज असते तिथं आपण अगदी सहज यूट्यूबवर किंवा प्राईम आणि अॅंमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्म्सवर वीडियो बघू शकतो किंवा वीडियो कॉल्सही करू शकतो. 

आता ‘जिथं रेंज चांगली आहे तिथं’ ही अडचण प्रामुख्याने टाळायचा प्रयत्न ५-जी तंत्रज्ञानात केलाय. ५-जी तंत्रज्ञानामुळे रेंज जास्तीत जास्त ठिकाणी चांगली असेल. कुठलंही कारण नसताना इंटरनेटचा स्पीड कमी होण्याचं प्रमाण कमी करायचा प्रयत्न केलाय. म्हणजेच मोबाईल सिग्नलची शक्ती एकसमान ठेवण्याचा प्रयत्न केलाय. 

दर सेकंदाला १ गिगाबाईट स्पीड

दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे, ‘लेटन्सी’ कमी करायचा प्रयत्न ५-जीमधे केलाय. आता ‘लेटन्सी’ म्हणजे काय, तर आपण जेव्हा कुठलीही वेबसाईट बघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती वेबसाईट किंवा वीडियो लोड होण्यासाठी काही वेळ लागतो. हा वेळ कशामुळे लागतो, तर आपला मोबाईल इंटरनेटवरून आपल्याला हव्या असलेल्या वेबसाईटच्या सर्व्हरला सिग्नलला पाठवतो आणि तो सर्व्हर उत्तरादाखल आपल्याला हवी असलेली वेबसाईट किंवा वीडियो पाठवतो. या गोष्टीला लागणारा जो वेळ आहे त्याला ‘लेटन्सी’ असं म्हणतात.

म्हणजेच आपण काही वेळा वेबसाईट अजून लोड होतेय किंवा वीडियो अजून बफर होतोय, असं म्हणतो किंवा ऐकतो ते ५-जीमधे बंद करायचा प्रयत्न केलाय. अगदी अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर सध्या आपल्याला मोबाईलवर जास्तीत जास्त १० ते १५ एमबीपीएस म्हणजे दर सेकंदाला १० ते १५ मेगा बाईट एवढा इंटरनेटचा स्पीड मिळतो. तो ५-जी आल्यावर कमीत कमी १ जीबीपीएस म्हणजे दर सेकंदाला १ गिगाबाईट एवढा जास्त मिळू शकेल. म्हणजे जवळपास सध्याच्या पेक्षा दहापट ते शंभरपट जास्त.

हेही वाचा : यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

मोठ्या गुंतवणुकीची गरज

५-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्व सेवासुविधांची एफिशिअन्सीसुद्धा काही पटीने वाढेल. ई-लर्निंग, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, शेती, रिमोट मेडिसीन, वाहतूक तसेच करमणूक क्षेत्रातील संधी आणि सुविधादेखील झपाट्याने वाढतील. याचप्रमाणे वर्चुअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी सारखी तंत्रज्ञानं छोट्या डिवाईसवर सामान्य लोकांना उपलब्ध होतील. कुठल्याही तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास मनुष्याच्या फायद्याच्या अनेक गोष्टी निर्माण होतात.

५-जी तंत्रज्ञान हे हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतं. फ्रिक्वेयन्सी जेवढी हाय तेवढी त्याची पेनिट्रेशनची क्षमता कमी होते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जास्त अँटेना लावायला लागतील. ५-जी तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे मोबाईल फोन किंवा इतर डिवाईस घ्यावे लागतील. सुधारित इंटरनेट स्पीडमुळे चांगली बॅटरी लाईफ असणारे डिवाईस घ्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तंत्रज्ञानाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक ही बऱ्यापैकी जास्त आहे. 

जगभरात ५-जी तंत्रज्ञान कुठं वापरलं जातं?

दक्षिण कोरिया, अमेरिका, चीन, जपान या देशांमधे तसेच स्वीडन, तुर्कस्तान, इस्टोनियासारख्या लहान देशांमधेपण ५-जी नेटवर्क लोकांच्या वापरासाठी उपलब्ध आहे. 

चीन हा ५-जीसाठी लागणाऱ्या, इक्विेपमेंटचा मोठा उत्पादक आहे. हुवाई ही त्यातली एक मोठी चिनी कंपनी आहे. परंतु, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशांना चिनी कंपन्या हेरगिरीसाठी या इक्विापमेंटचा वापर करतात, अशी शंका आल्याने त्यांनी चिनी ५-जी इक्विहपमेंटच्या वापरला बंदी घातलीय. काही युरोपिय देशांनी आता नोकिया किंवा एरिक्सन या कंपन्यांना हे काम दिलंय.

हेही वाचा : आता गूगलच्या गुंतवणुकीचे गुणगान गायला हवं!

भारतात ५-जी नेटवर्क कधी चालू होणार?

भारतातल्या मोबाईल सेवा देणाऱ्या सर्व मोठ्या कंपन्या ५-जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या  चाचण्या करतायत. परंतु, सरकारकडून म्हणजेच दूरसंचार विभागातर्फे ५-जी स्पेक्ट्रम लिलावाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहिय. वेगवेगळ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, २०२१ सालच्या पहिल्या तिमाहीत हे लिलाव होतील.

नुकत्याच झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमधे बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ २०२१ सालच्या उत्तरार्धात ५-जी सेवा भारतात सुरू करेल. त्याशिवाय हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतीय बनावटीचे असेल. जिओ आणि क्वा-लकॉम एकत्र या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. साधारणपणे ३,००० रुपये किमतीचा ५-जी स्मार्ट फोनपण ते लाँच करणार आहेत.

जिओ सोडून भारती एअरटेल, वोडाफोन-आयडिया या कंपन्यादेखील हुवाई, एरिक्सन अशा कंपन्यांबरोबर भारतात ५-जी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

भारत सरकारने नुकताच पीएम वाणी नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घोषित केलाय. यामधे अख्खा देश वायफाय करणार आहेत. यामुळे लोकांना सगळीकडे सहज जलदगती इंटरनेट उपलब्ध होईल. पूर्वी कसे पीसीओअसायचे तसेच आताही असणार आहेत. त्यामुळे बऱ्याच छोट्या छोट्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे. पंतप्रधानांनीदेखील ५-जी सेवा लवकरात लवकर सुरू करून, जनसामान्यांना परवडेल अशा दरात देण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असं म्हटलंय.

हेही वाचा : 

पाणी कसं प्यावं?

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

जगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यंदा मंदीचं सावट