कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.
आज भाऊबीज. भारतातल्या बहीण भावांसाठी एक महत्त्वाचा दिवस. परवाच नेहरू जयंतीही झालीय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही.
महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात.