महाराष्ट्र आणि हरयाणानंतर आता सगळ्यांच्या नजरा झारखंडच्या निवडणुकीकडे लागल्यात. राहुल गांधींच्या रेप इन इंडिया या विधानानंतर तर झारखंडमधल्या निवडणूक प्रचाराने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सगळ्याच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावलीय. काही करून सत्तेत येण्याचा पण केलाय. या सगळ्यांत सत्ता कुणाची येणार यापेक्षा किंगमेकर कोण बनणार याला खूप महत्त्व आलंय.
2
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
2
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
5
आसाममधल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी तिथे एनआरसी लागू करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी उठवलेले वादळ कायम असतानाच केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलंय. या दोन्हींमधील फरक काय, आताचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, त्यांना विरोध का होतोय यासारख्या प्रश्नांवर टाकलेला हा प्रकाश.
15
भारतात धर्म ही गोष्ट संवेदनशील झालीय. त्यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांना फाटा देण्यासाठी सरकार धर्माला मधे आणते. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्ट्रेशन रजिस्टरमधून सरकार भारताला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलतंय. आज गांधीजी असते तर त्यांनीही या विधेयकाला विरोध केला असता, अशी भूमिका मांडणाऱ्या पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूक पोस्टचा हा अनुवादित भाग.
19
आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं.
5
‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय.
महाराष्ट्रात सत्तेचं गणित जमवण्यात अपयश आल्यानंतर भाजपसाठी झारखंडची निवडणूक महत्त्वाची झालीय. कारण महाविकास आघाडीच्या सत्ता प्रयोगापासून धडा घेऊन झारखंडमधेही विरोधी पक्ष एकजूट झालेत. दुसरीकडे सत्ता पार्टनर आजसूनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला एकटं लढावं लागतंय.
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत.
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?
यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.
गोवा. गोमंतभूमी. नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहावेत अशी सुंदर यक्षभूमी. गोवा जरा उशिरा पाहिला. पण गोवा ही तारुण्यात पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. तारुण्यात आणि त्यानंतर आयुष्यभर सतत. बालपण हे गोवा कळण्याचं वय नाही. उसळणार्या समुद्राच्या फेसाळणार्या लाटा आणि त्या मोठ्या आनंदानं क्षणोक्षणी झेलणारा किनारा. गोव्यातल्या किनाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख.
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल.
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.
इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख.
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज.
आज ६ डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आंबेडकरांना जाऊन ६३ वर्ष झाली. या काळात आपण आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित केलंय. तसं हे आंबेडकर हयात असतानापासूनच सुरू होतं. पण खूप कमी जणांना आंबेडकरांचा दलित्तेतरांसाठीचा लढा माहीत आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला विधिमंडळावरचा पहिला मोर्चा हा दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काढला.
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.
आर्थिक मंदी अर्थव्यवस्थेचे सगळे फासे उलटे सुलटे करत असताना म्युच्युअल फंड्समधली गुंतवणूक चालू ठेवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर खरंतर गुंतवणूकदाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. गुंतवणूक यशस्वी करण्यासाठी शिस्त आणि पद्धतशीरपणा हवा.
‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा, गैरसमज मोडणारा होता. हैदराबाद घटनेनंतर पुन्हा एकदा सगळीकडे बलात्कार आणि त्याविरोधात काय केलं पाहिजे याची चर्चा सुरू झालीय. मधुमिताचा प्रबंध आणि त्यात तिला आलेले अनुभव यांचा विचार नक्की केला पाहिजे.
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय.
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय.
काही हिंदी सिनेमे कायमचे मनात घर करून राहतात. आराधना हा रसिकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात असाच बसलाय. १९६९ च्या नोव्हेंबरमधे तो रिलिज झाला. त्याला आता ५० वर्षं झालीत. इफ्फी फिल्म फेस्टिवलमधेही हा सिनेमा दाखवण्यात आला. हा मान त्याला मिळाला यात नवल असं काही नाही.
अजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय.